Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो तुम्हाला शासकीय कामासाठी लागणाऱ्या ‘या’ पैशांचा खर्च होणार कमी; राज्य शासनाचा निर्णय

0

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता शासकीय कामांसाठी नागरिकांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विविध शासकीय प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रासाठी नागरिकांना 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. त्याचा फटका विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसत होता.

उत्पन्नाचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर अनेक प्रमाणपत्रासाठी 500 रुपये प्रत्येकी लागत होते.

म्हणजेच केवळ मुद्रांक शुल्कापोटीच विद्यार्थ्यांना वर्षाला 2 हजारांहून अधिकचा खर्च येत होता. पण आता हा खर्च वाचणार आहे.