कृषी कर्ज मित्र योजना! जाणून घ्या सविस्तर माहिती…
1)कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्दिष्ट
▪️शेतकर्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी वेळेत करून देणे
▪️याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास करणे.
▪️शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात विनाविलंब कर्ज उपलब्ध करून देणे.
▪️सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्याची सुटका करणे. ही या योजनेची उद्दिष्ट आहेत.
2)कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरूप
▪️दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात.
▪️लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता, यात विषमता आढळून येते.
▪️कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात भर पाडणे आवश्यक आहे.
▪️निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येते.
▪️त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या व्यतिरिक्त शेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे.
▪️या कर्जाच्या प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना कर्ज मिळणे शक्य होत नाही.
▪️अशा इच्छूक आणि पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत देणे गरजेचे आहे.
▪️ही बाब लक्षात घेऊन यांच्या मदतीने गरजू आणि पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज मिळवून देणे आवश्यक आहे.
▪️अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार करून दिल्यास, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल.
3)या योजनेसाठी प्रतिप्रकरण सेवाशुल्काचा दर
▪️अल्प मुदतीचे कर्ज
▪️ प्रथमतः पीक कर्ज घेणारा
▪️पहिल्यांदाच पीक कर्ज घेणारा शेतकरी असेल
▪️त्याला प्रति प्रकरण सेवाशुल्क 150/- रुपये आकारला जातो.
▪️मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेणारा
▪️नवीन कर्ज प्रकरण असेल, तर त्यासाठी शेतकऱ्याला प्रति प्रकरण 250/- रुपये सेवा शुल्क आकारण्यात येते.
▪️कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण करावयाचे असल्यास.
▪️शेतकऱ्याला प्रति प्रकरण 200/- रुपये सेवाशुल्क भरावा लागेल.
4)कृषी कर्ज मित्र नोंदणी कशी करावी
▪️कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कृषीकर्ज मित्र नोंदणी करायची आहे.