Take a fresh look at your lifestyle.

मुलांच्या शाळांची वेळ बदलली; शालेय विभागाचा मोठा निर्णय

0

शालेय विभाग एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा असे राज्यपाल रमेश बैस यांनी अलिकडेच सुचविले होते. यासंदर्भात सरकार राज्यपालांच्या मताशी सहमत असल्याचे समोर आले आहे.

अशातच येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

तसेच हा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे केसरकर यांनी सांगितले आहे.