Take a fresh look at your lifestyle.

भारतीय राज्यघटनेतील भाग चार A मधील कलम 51 प्रमाणे, भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये

0

१.संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर राखणे.

२.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्फूर्ती देणा-या आदर्शांची जोपासना करुन त्यांचे अनुसरण करणे.

३.भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.

४.देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे.

५.धार्मिक,भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.

६.आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करणे.

७.वने,सरोवरे, नद्या, वन्यजीव स्रृष्टी अशा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे.

८.विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा विकास करणे.

९.सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे.

१०. राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे, यासाठी व्यक्तिगत व सामुदायिक कार्यामध्ये उत्तमता संपादन करणे.

११.जन्मदाता किंवा पालकाने आपल्या पाल्यास वयाच्या सहाव्या वर्षापासून चौदा वर्षांपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

भारतीय नागरीकांनो, अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव असूद्या.