Take a fresh look at your lifestyle.

‘विकसित भारत @२०४७’ साठी २०२७ जनगणना ठरणार गेमचेंजर!

0

देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया ठरणारी ‘जनगणना २०२७’ प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू होणार असून, “आपली जनगणना, आपला विकास” या प्रभावी ब्रीदवाक्यासह केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. ‘विकसित भारत @२०४७’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करताना ही जनगणना निर्णायक ठरणार आहे.

दोन टप्प्यांत होणार संपूर्ण प्रक्रिया

जनगणना यावेळी अधिक सुसूत्र आणि तांत्रिक पद्धतीने पार पडणार आहे:

🔹 पहिला टप्पा (एप्रिल–सप्टेंबर २०२६)

घरांची यादी, सुविधा, मालमत्ता यांची नोंद — ३० दिवसांच्या निश्चित कालावधीत पूर्ण

🔹 दुसरा टप्पा (फेब्रुवारी २०२७)

देशातील प्रत्येक व्यक्तीची अचूक लोकसंख्या मोजणी

‘Self-Enumeration’मुळे जनगणना झाली स्मार्ट!

डिजिटल भारताच्या दिशेने मोठे पाऊल टाकत सरकारने ‘स्व-गणना’ सुविधा सुरू केली आहे.

👉 नागरिक आता se.census.gov.in वर स्वतः माहिती भरू शकतात

👉 मिळणारा SI ID प्रगणकाला दाखवल्यास प्रक्रिया झटपट पूर्ण

तुमची माहिती १००% सुरक्षित

सरकारने स्पष्ट केले आहे की: जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत सर्व माहिती गोपनीय

वैयक्तिक ओळख उघड केली जाणार नाही

कर किंवा चौकशीसाठी माहितीचा वापर होणार नाही

 

जनगणना का महत्त्वाची?

✔️ अचूक धोरणनिर्मितीसाठी डेटा

✔️ संसाधनांचे समतोल वाटप

✔️ शाळा, रुग्णालये, रस्ते यांचे योग्य नियोजन

✔️ सर्व घटकांचा समावेशक विकास

सरकारचे नागरिकांना आवाहन

“तुमची अचूक माहितीच देशाचा भविष्याचा मार्ग ठरवते. प्रगणकांना सहकार्य करा आणि जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नोंदवा,” असे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.