शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे हलके होणार; भुविकास बँकांबाबत शासनाची मोठी पावले
महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या, मुंबई (शिखर भुविकास बँक) तसेच जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांकडून (जिल्हा भुविकास बँका) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या बँकांकडील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याबरोबरच बँकांच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरित करून त्यांचे व्यवस्थापन सरकारकडे घेण्याबाबत महत्त्वाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी भुविकास बँकांमार्फत दीर्घकालीन कर्ज घेतले असून आर्थिक अडचणींमुळे त्यांची परतफेड करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी शासन स्तरावर संपूर्ण कर्जमाफीचा पर्याय विचाराधीन आहे.
यासोबतच शिखर भुविकास बँक व जिल्हा भुविकास बँकांच्या मालकीच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. या प्रक्रियेमुळे बँकांचे आर्थिक पुनर्रचना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतल्यास ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
