Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आखले ‘हे’ नवे धोरण…

0

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, देशात जवळपास प्रत्येक तासाला एक विद्यार्थी मृत्यूला कवटाळत आहे. सध्या हा आकडा आणखी वाढताना दिसत आहे. ज्याला कोचिंग हब म्हटले जाते, अशा कोटामध्ये या वर्षी आतापर्यंत 27 किशोरवयीन मुलांनी मृत्यू निवडला आहे. आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी भारत सरकारने मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत.

सरकारचे नवे धोरण UMMEED प्रभावी ठरेल आणि किशोर आणि तरुण विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांमध्ये काही प्रमाणात घट होईल, अशी आशा आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हे थांबवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पालकांचीही भूमिका आहे आणि शाळा, महाविद्यालय, कोचिंग संस्थेतील प्रत्येक जबाबदार सदस्याचीही भूमिका आहे.

त्याला UMMEED असे नाव देण्यात आले आहे, ज्याचा अर्थ Understand, Motivate, Manage, Empower, Develop. याच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मार्गदर्शक तत्त्वांवर काम करून किशोर आणि तरुण विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण कमी करता येईल, असा सरकारचा विश्वास आहे.