नागरिकांनो आपले दवाखान्याचे बिल भरण्यासाठी केंद्र सरकारची ‘ही’ योजना ठरतेय फायद्याची…
केंद्र सरकारमार्फत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेच्या मार्फत अनेक नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा मिळते. केंद्र सरकारने ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 साली सुरु केली आहे.
या योजनेतून अनेक गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य विमा उपलब्ध केला जातो. केंद्र सरकारच्या या योजनेतून 10 कोटीपेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. तसेच ज्या लोकांकडे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आहे त्यांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.

जर नागरिकांकडे आयुष्मान भारत योजनेंच कार्ड असेल तर त्या नागरिकाला भारतातील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतो. जर तुम्ही आयुष्मान भारत योजना कार्डधारक असाल आणि या योजनेत असणाऱ्या हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला तर तुम्ही तातडीने रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल करु शकता. यासंदर्भात तक्रार करायची असल्यास नागरीक राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 14555 वर नोंदवू शकतात.