पोस्ट ऑफिस योजना; महिन्याला मिळतील 4950 रुपये
पोस्ट ऑफीस मधील या योजने अंतर्गत गुंतवणूक दाराना त्यांनी गुंतवलेल्या रकमेवर व्याज मिळत असते. चालू काळाला हे व्याज गुंतवणूक दराना साडेसहा टक्के येवढे मिळत आहे. पोस्ट ऑफीस मंथली स्कीम योजना ही भारतीय डाक विभागाने ज्याचे उत्पन्न हे प्रत्येक महिन्याला मिळत असते, अशा नोकरदार लोकांसाठी काढलेली आहे.
भारतीय डाक विभागाच्या योजना या अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या योजनांमध्ये ग्राह्य धरले जातात. या कारणामुळेच सामान्य जनता पोस्ट ऑफीस मधील योजना मद्ये गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी सरकारचा सुधा पाठिंबा असतो त्यामुळे लोकांचा या योजनेवर जास्त प्रमाणात विश्वास आहे.तसेच या योजनेत गुंतवणूक करणारला हे माहीत असते की,योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर किती रक्कम मिळणार आहे.
योजनेचे उद्दिष्ट:- भारतीय डाक विभागाने काढलेली ही अशी योजना आहे की यामधे पोस्ट ऑफीस हे वार्षिक व्याज हे 6.6 येवढे देते. या योजनेचा कालावधी 5 वर्षांनंतर पूर्ण होतो. याचा अर्थ असा की 5 वर्ष नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला उत्पन्न मिळेल. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर अजून पुढे पाच वर्षे वाढवता येतात.त्याच प्रमाणे खाते धारक कालावधी पूर्ण हो्यापूर्वीच मरण पावला तर त्याच्या वारस दाराला पैसे दिले जातात. या योजने मध्ये खाते उघडण्यासाठी 1000 रू लागतात.
या योजनेत मासिक उत्पन्न किती मिळू शकते:- या योजनेत 6.6% वार्षिक व्याज दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत ९ लाख रु गुंतवले असतील तर त्याला 6.6 वार्षिक व्याज म्हंजे 59,400 रू मिळतील.हे त्याने गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून असते. जर त्या व्यक्तीला महिन्याला पाहिजे असेल तर 4950 रू प्रमाणे प्रत्येक महिन्याला मिळतील .त्याने गुंतवलेली रक्कम आहे तशीच राहणार आहे.
या योजनेसाठी किती आणि कोण गुंतवणूक करू शकतात:- भारतीय डाक विभागाच्या मासिक उत्पन्न योजने मध्ये वैयक्तिक आणि जोड खाते.असे दोन्ही प्रकारे खाते उघडता येतात. एका व्यक्तीच्या नावाने एका खात्यावर 4.5 लाख रु ठेवता येतात तर जोड खात्यात ही रक्कम 9 लाख रुपये पर्यंत ठेवता येते. वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती हे खाते काढू शकतो. एक वर्ष अगोदर यात गुंतवलेले रक्कम काढता येत नाही. भारतीय डाक विभागाच्या या योजनेत गुंतवलेले पैसे हे मुदती अगोदर काढता येत नाही. उलट मुदत पूर्ण होण्या आधीच जर पैसे काढले तर दंड म्हणून 1% रक्कम कमी केली जाते. तर कालावधी पूर्ण झाल्यानंतर काढले तर योजनेचा पूर्ण फायदा घेता येतो.
अशा प्रकारे भारतीय डाक विभागाने काढलेली ही मासिक उत्पन्न मिळून देणारी योजना आहे. याचा जरूर लाभ घ्यावा.