क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
शून्य (०) ते अठरा (१८) वर्षे वयोगटातील बालकांच्या संगोपनासाठी राज्य शासनाची महत्त्वाची सेवा योजना महाराष्ट्र शासनाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही शहर व ग्रामीण भागातील सर्व गरजू बालकांसाठी आहे. या योजनेसाठी बांधकाम कामगारच असणे आवश्यक नाही. या योजनेचा बालकांना अठरा वर्षापर्यंत दरमहा 2250 रुपये लाभ कोणाला मिळू शकतो.
पात्रता-
✔️ ज्या बालकांचे आई किंवा वडील किंवा दोघांचेही निधन झाले आहे
✔️ अनाथ, निराधार, निराश्रित बालक
✔️ दुर्धर आजारग्रस्त बालक किंवा दुर्धर आजारग्रस्त पालकांचे पाल्य
✔️ कर्करोग, कुष्ठरोगग्रस्त पालकांचे बालक
✔️ कारागृहातील कैद्यांचे पाल्य
✔️ तीव्र मतिमंद, अंध, दिव्यांग बालक
✔️ ४०% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली बालके
✔️ तीव्र कुपोषित बालके
✔️ कौटुंबिक कलहामुळे बाधित बालक
✔️ लैंगिक अत्याचार पीडित बालक
✔️ कोविड–१९ मुळे पालक गमावलेली बालके
अर्ज कुठे करावा- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
