Take a fresh look at your lifestyle.

उमेद अभियानातंर्गत महिलांना मिळणार २० लाखापर्यंत कर्ज

0

उमेद अभियान अंतर्गत महिलांना मिळणारे हे कर्ज पूर्वी १५ लाख एवढे होते ते आता वाढवून २० लाख रुपये करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हे कर्ज विनाकारण असणार आहेत्यामुळे आता गटातील महिलांना मोठा व्यवसाय वरून त्यातून शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत महिला बचत गटांची स्थापना केली जाते. त्यानंतर या गटांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

स्व-मदत म्हणजे स्वतःला मदत करणे. दुस-याच्या मदतीवर अवलंबून न राहणे, कुटुंब चालवताना होणारे छळ किंवा त्रास टाळणे. बचत गट स्थापन करण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 समविचारी लोकांचा किंवा त्याच गावातील किंवा पाड्यातील महिलांचा गट एकत्र आणणे आवश्यक आहे ज्यांच्या आर्थिक गरजा समान आहेत.

विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गट स्वच्छपणे एकत्र आला तर त्याला ‘स्वयंसहाय्य गट’ किंवा ‘बचत गट’ म्हणता येईल. या बचत गटाचा प्रत्येक सदस्य ठराविक कालावधीत बचत म्हणून एकसमान रक्कम जमा करतो. याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज देण्यासाठी केला जातो. त्याला ‘बचत गट’ (बचत गट) म्हणतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने घातलेल्या अटी:- राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अणि केंद्र सरकारने ठरवलेल्या धोरणाप्रमाणे ह्या योजनेचा लाभ त्याच बचत गटाला घेता येईल ज्याची जिल्हयातील ग्रामीण विकास यंत्रणेकडे नोंद असेल.

ज्या महिला बचत गटाकडुन आपल्या घेतलेल्या कर्जाची वेळेवर अणि नियमितपणे परतफेड करण्यात येते अशा महिला बचत गटाला या योजनेमार्फत व्याजावर अनुदान प्रदान करण्यात येते अणि अशा बचत गटांना शुन्य टक्के व्याज दराची आकारणी करून कर्ज देखील देण्यात येत असते.